SR 24 NEWS

इतर

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे २१ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवले जीवन ; राहुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील एका २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, राहुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप गंगाधर बालसाणे (वय २१, रा. सात्रळ, ता. राहुरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. संदीपने ६ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक संविता गंगाधर बालसाणे व इतरांनी त्याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण मेडिकल कॉलेज अँड प्रवरा ग्रामीण रुग्णालय, लोणी (ता. राहता) येथे हलवले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

​या घटनेची माहिती लोणी पोलीस स्टेशनच्या वतीने राहुरी पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ (बी.एन.एस. १९४ प्रमाणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोकाटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!